पुणे (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. यंंदाही कोरेगाव भीमा येथे शौर्यदिन साजरा केला गेला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Aathvale) उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नवा वर्षाचा संकल्प असल्याचं रामदास आठवले म्हणाले.
कोरेगाव भीमाला मी भेट दिली आहे. आमच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. शौर्यदिन आहे. नवीन वर्षाचा हा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवणं आहे. रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील संकल्प असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे. आज मला झालाय फार हर्ष कारण आमच्या समोर उभं आहे २०२२ चं वर्ष असं रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी राज्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार घालवायचं हा संकल्प असल्याचं सांगितलं. रामदास आठवले यांनी २०२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील एक संकल्प असल्याचं म्हटलं आहे.
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इथ येणार – चंद्रशेखर आझाद
जसे जगण्यासाठी श्वासाची गरज लागते, तसं नव्या वर्षाच्या सुरवातीला येथे यावे लागते. जो पर्यंत जिवंत आहे तो पर्य़ंत येथे येत राहणार असल्याचं चंद्रशेखर आझाद म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांसाठी काम केलं. २०१८ मध्ये घडलेली घटना दुखद होती. पण २०१८ मधल्या केसेस पेंडींग आहेत. सरकार त्याबाबत काही करत नाही. पुढील काळात सरकारनं काही केल नाही तर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देखील चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली. मास्क आणि नियमांचा कार्यकर्त्यांना विसर पडल्याचंही दिसून आलं.