जळगाव (प्रतिनिधी) खान्देश इनोव्हेशन चॅलेंज २०२२ ह्या केसीआयआयएल (कबचौउमवि, जळगाव येथील नवउद्योजक मार्गदर्शन केंद्र) मार्फत सुरू केलेल्या उपक्रमाचे उद्धाटन खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार सुरेशमामा भोळे, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकुर, जिल्हा कृषी तंत्र अधिकारी अनिल भोकरे, संपूर्ण केसीआयआयएलची टीम व इतर मान्यवर अधिकारी यांच्या हस्ते कृषी व महिला उद्योजकता आणि नाविन्यता परिषद-२०२२ परिषदे दरम्यान जिल्हा नियोजन सभागृह येथे झाले.
या अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग , मोठे उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, सरकारी विभाग दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या काही महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी इच्छुकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि अशा प्रकारे उत्पादनातील नावीन्यपूर्ण संस्कृती आणि समस्या सोडवण्याची मानसिकता विकसित करण्यासाठी एक प्रादेशिक उपक्रम आहे. यासंबांधित अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९७००१६२११/ ०२५७२२५७४४८ क्रमांकावर संपर्क साधावा.