मुंबई (वृत्तसंस्था) देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही… असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव यांनी भाजपावर हल्लाबोल केला. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्काबद्दल कुणी आवाज उठला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
कामगार कायदे, कृषी कायदे करून कामगारांची, शेतकऱ्यांची गळपेची करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. सध्या देशात शेतकरी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही. असं ते म्हणाले. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तुम्हीच कांदा पाकिस्तानातून आयात करता आणि आता शेतकरी देखील पाकिस्तानातून आणता का? असा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या हिताची नसलेली कृषी कायद्यातील एकही गोष्ट महाविकास आघाडी सरकार स्वीकारणार नाही, असेही ठाकरे यांनी जाहीर केलं.