अहमदनगर (वृत्तसंस्था) भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमारजी हे त्याच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल, असे ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमारजी हे त्याच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल,’ असेही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.