जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कारासाठी निवड केली आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षणासाठी आयुष प्रसाद यांनी पुणे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना भरीव काम केले होते. त्यासाठी त्यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कारासाठी आयोगाने निवड केली आहे. तसे पत्र आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी दिले आहे. या पुरस्काराचे वितरण २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे.