छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना विजेचा शॉक लागून शहीद झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता.
तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये सुरतमकाळी बजावत होते. त्यांना २६ २६ जून येथे सेवा वीर मरण आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. उमेश मिसाळ यांचा अवघ्या सहा महिन्यापूर्वीच केकानवाडी येथील प्रतीक्षा यांच्याशी विवाह झाला होता. सोमवारी सकाळी परेडसाठी जात असताना भूमिगत विजवाहिनीतून त्यांना धक्का बसून ते सेवारत असतानाच शहीद झाले.
सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेशचे पार्थिव घेऊन मंगळवारी (दि. २७) रात्री दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्यानंतर ते २८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी’ येथे पोहोचणार आहेत. नंतर शहीद जवान उमेश मिसाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गावात उमेश मिसाळ याच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समजताच त्याच्या कुटुंबातील आई-वडील व पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले आहे.
उमेश हे फेब्रुवारी २०२१ रोजी सैन्य दलात भरती झाले होते. २९ ऑगस्ट २०२२ रोजी केज तालुक्यातील केकानवाडी येथील प्रतीक्षा हिच्याशी विवाह झाला. तसेच ते दीड महिन्यांपूर्वी पुतणीच्या लग्नाला गावी आले होते. परंतू पुतणीच्या हळदीच्या दिवशीच त्यांना मराठा बटालियनमध्ये तातडीने परत येण्याचे आदेश आले. यामुळे पुतणीचे लग्न सोडून ते देशसेवेसाठी सुरतगढ, राजस्थानकडे रवाना झाले होते. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 2 भाऊ असा परिवार आहे.