चाळीसगाव (प्रतिनिधी) : दैनिक भास्कर चे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी व आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांनी संघटनेत व पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना संघटनेच्या वतीने देशपातळीवरील मानाचा असा पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील श्री बालाजी मंगल कार्यालय येथे संघटनेचा 22 वा स्थापना दिवस दि 16/10/22 रोजी साजरा झाला त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद वाचस्पती होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल होते तर कार्यक्रमास आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्रा, राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, यु पी चे प्रदेश सचिव डॉ बृजेश यदुवंशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख लूनेश्वर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष रशीद खान, विदर्भ प्रमुख सोमेश्वर जेवडे, एम पी बुऱ्हाणपूर जिल्हा अध्यक्ष राहुल खंडेराव, जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश वर्मा, मेळघाट अमरावती अध्यक्ष आरिफ खान पठाण, धुळे जिल्हा अध्यक्ष रोहितदास वानखेडे आदी पदाधिकारी, सदस्य पत्रकार उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद वाचस्पती, आमदार राजकुमार पटेल, संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्रा, राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, यु पी चे प्रदेश सचिव डॉ बृजेश यदुवंशी यांच्या हस्ते सूर्यकांत कदम यांना देशपातळीवरील मानाचा असा पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.