धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी बु. येथे घरकुल रद्द का केले, याचा जाब विचारल्याच्या वादातून एकाला सरपंचांसह ७ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात बिबाबाई कालू पटेल (वय ६२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिबाबाई यांचा मुलगा शौकत कालु पटेल यांने सरपंच कौसरबी पटेल यांना माझे घरकुल का रद्द केले?, असे विचारणा केली. त्यावर रफिक हिलाल पटेल, फारुख हिलाल पटेल, कौसरबी हिलाल पटेल, शकील येडू पटेल, वाहेद इमाम पटेल, राजू दादामिय्या पटेल, बाबू सुभान पटेल (सर्व. रा.कंडारी बु. ता. धरणगाव) यांनी संगनमताने अश्लिल शिविगाळ, दमदाटी करून चापटा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना प्रमोद पाटील हे करीत आहेत.