जळगाव (प्रतिनिधी) पंगत बसली आणि बुंदी संपली, असं सोशल मीडियावर ऐकलं. परंतू मी म्हणेल की, मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था एकनाथराव खडसेंची झाली आहे, अशी मिश्कील टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते तसंच नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी झाली आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. “खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे”, असं गिरीश महाजन म्हणालेत. परंतू एकनाथ खडसे यांनी नुकतंच विधान परिषदे शपथ घेतली. त्यांना माझ्या शुभेच्छा, असं महाजन म्हणायला महाजन मात्र, विसरले नाही. तसेच मी गुवाहाटीला वगैरे गेलो नाही. मी मुंबईतच होतो. आता आमचं सरकार सत्तेत आलंय, असं ही महाजन म्हणालेत.