जळगाव (प्रतिनिधी) येथील पिंप्राळा परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवित तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. सात दिवस उलटूनही मुलगी परत न आल्याने याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पिंप्राळा परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. २८ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला करण अर्जून राठोड रा. घाणेगाव तांडा ता. सोयगाव याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. सात दिवस उलटूनही मुलगी परत न आल्याने अखेर ४ जानेवारी रोजी मुलीच्या नातेवाईकांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन करन अर्जुन राठोड याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ देशमुख हे करीत आहेत.