TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

२६ ग्रामपंचायतींना ISO मानांकन : सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान

vijay waghmare by vijay waghmare
December 16, 2025
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) | – गाव पातळीवरील प्रशासन सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख झाले तरच तालुका, जिल्हा आणि अख्खा महाराष्ट्र सक्षम होतो. पंचायतराज व्यवस्था ही लोकशाहीचा कणा असून गावाच्या विकासाची खरी सुरुवात ग्रामपंचायतीपासून होते, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत धरणगाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी धरणगाव तालुक्यातील ISO मानांकन प्राप्त २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ISO मानांकन हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न राहता ते सेवा, शिस्त, वेळबद्धता आणि पारदर्शक कारभारातून गावकऱ्यांना प्रत्यक्ष दिसले पाहिजे. ग्रामपंचायतींनी नागरिकांचा विश्वास संपादन केल्यास विकासकामांना गती मिळते. कर वसुलीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कर वसुली ही दंडात्मक प्रक्रिया नसून गावाच्या विकासातील नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. शासन निर्णयानुसार किमान ५० टक्के कर वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

पर्यावरण संवर्धनाबाबत त्यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, हा उपक्रम पर्यावरण रक्षणाबरोबरच सामाजिक भावनेचा संगम असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने आणि एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धरणगाव पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून धरणगाव तालुका व येथील ग्रामपंचायती विभागीय व राज्यस्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), भाऊसाहेब आकलाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पी. सी. आबा पाटील, माजी सभापती श्री मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, पी. एम. पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी वर्ग व पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बोडरे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धरणगाव तालुका ग्रामसेवक संघटनेने विशेष सहकार्य केले. हा कार्यक्रम क्रांतीवीर. ख्वाजा ख्वाजाजी नाईक स्मृती संस्था, डॉ. हेडगेवार नगर, धरणगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanMaharashtra becomes empowered only when the village becomes empowered - Guardian Minister Gulabrao Patil

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
Next Post

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : संक्रांतीसाठी माहेरी आलेल्या लेकीवर हैवान बापानेच केला बलात्कार

January 17, 2022

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025

जैन मुनिवर्यांच्या चातुर्मास स्थळाबाबत खान्देश अहिंसा प्रेमींमध्ये उत्सुकता !

May 31, 2024

धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group