मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीवर अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे ‘खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा’ अशी स्थिती असल्याचं त्या म्हणाल्या.
खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालो को सुरक्षा भी दूंगा, असेच काहीसे महाराष्ट्राचे सध्याचे वातावरण आहे. म्हणत त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीला चिमटे काढले आहेत. मात्र हे आता बंद झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचं राजकारण हवा आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे, असे अमृता फडणवीसांनी ठणकावले आहे. जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात. तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात. तेव्हाच ते कारवाई करतात आणि ते निष्पक्ष पद्धतीनेच तपास करतात, असे सर्टीफिकटही त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना देऊन टाकले. आता आपण आता बोलून काही उपयोग नाही. या सर्व चौकशांचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यावर कळेलच, असेही त्या म्हणाल्या. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतून सुरू आहेत, असा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवर करण्यात येत आहे. त्यालाच अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.