मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील बस्थानकात ग्रामीण भागातून ये-जा करणार्या विद्यार्थीनींची टारगट तरूण छेड काढत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत असून येथे कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त लावावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी आज पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची भेट घेऊन चर्चा केली.
शैक्षणिक वर्ष २०२२-०२३ च्या शाळा महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुक्ताईनगर बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विद्यार्थी हे गरीब घरातील विद्यार्थी असल्या कारणाने त्यांचे अपडाऊन बसवर अवलंबुन असते. ग्रामिण भागातील विद्यार्थीनी या शिक्षणासाठी ये-जा करत असतात या विद्यार्थिनी बसची वाट पाहत बसस्थानकात थांबल्या असताना बसस्थानक परिसरात फिरणारे मवाली हे मुलींची छेडखानी करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा अनुचित घटना घडू नये यासाठी बसस्थानकावर कायम स्वरूपी पोलिस कर्मचार्यांची नियुक्तीची करावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकडे केली आहे. तसेच मुक्ताईनगर आगरप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणार्या वारकर्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकर्यांच्या सोयीसाठी मुक्ताईनगर आगाराने मुक्ताईनगर ते पंढरपुर बसफेर्यांचे नियोजन करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे,भागवत पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजुभाऊ माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनिल काटे, बाळा भाऊ भाल शंकर,प्रविण पाटील, बापु भाऊ ससाणे,अमिन खान,अनिल पाटील, संजय कपले,संजय कोळी, योगेश काळे, चेतन राजपूत,विनोद काटे, प्रकाश डहाके, ललित पाटील, एजाज खान,चंद्रकांत पाटील,विनोद महाजन,महेश पाटील, एकनाथ प्रधान आदी उपस्थित होते.