जळगाव (प्रतिनिधी) मविप्र वाद संदर्भात ॲडव. विजय पाटील यांनी दिलेली फिर्याद रद्द करावी यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज कामकाज होऊ शकले नाही. यावर पुढील सुनावणी आता २७ जानेवारी रोजी होणार आहे.
ॲड. विजय पाटील यांनी दिलेली फिर्याद रद्द करण्यात यावी यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मविप्र संस्था हडपण्यासाठी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यासह नीलेश भोईटे व नातलगांनी पुण्यात डांबुन ठेवत मारहाण केली. खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतली अशी फिर्यादी ॲड. विजय पाटील यांनी दिली आहे. तसेच ही फिर्याद नुकतीच कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ही फिर्याद रद्द करण्यात यावी यासाठी महाजन, रामेश्वर नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व एम. एस. कर्णीक यांच्या न्यायालयात गुरुवारी ही सुनावणी होणार होती. परंतू, दाखल केलेल्या याचिकेवर आज कामकाज होऊ शकले नाही. फिर्याद रद्द करण्याच्या संदर्भात न्यायालयात २७ जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. सरकार व फिर्यादी पक्षाने हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
















