पनवेल (वृत्तसंस्था) नाव्हाशेवा येथील पाणीपुरवठा योजनेचे टप्पा तीनचे उद्घाटन आज जलशुद्धीकरण केंद्र भोकरपाडा तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेतून राज्याची वाढती लोकसंख्या पाहता ही योजना प्रत्येक गाव पाथडी जिल्हा स्तरावर राबवली जाणार आहे. जेणेकरून पाणी पुरवठा जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचविण्यात यावा, सध्या पाण्याची मागणी वाढत असल्याने त्या ठिकाणी ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. या योजनेत जलशुद्धीकरण केंद्रावर वाया जाणारे पाणी पुनश्च वापरण्यात यावे. या अशा विविध बाबी या पाणीपुरवठा योजनेतून जनतेसाठी पुरविण्यात येणार आहेत. यावेळी उपस्थित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्री एकनाथ शिंदे, संजय बनसोडे राज्यमंत्री, आदित्य ठाकरे, किशोरराजे निंबाळकर सदस्य सचिव संजय चाहांदे, मुख्य अपर सचिव मोतीराम पाटील आदी उपस्थित होते.
















