मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली असून, त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईविरोधात मलिक यांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आहे.
नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, त्यांना करण्यात आलेली अटक हे बेकायदेशीर आहे. तसेच त्यांना ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली आहे. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.