ठाणे(वृत्तसंस्था) : हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर आता पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड एका नव्या वादात अडकले आहेत. काल (रविवारी) रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून यावेळी एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदारकीचा राजीनामा देणार म्हणून ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. तर आक्रमक कार्यकर्त्यांनी मुंब्र्यात रिक्षा बंद पडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.