जळगाव (प्रतिनिधी) भाजप पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी तापीपात्रातील अतिक्रमणची पाहणी केली असता याठिकाणी काही प्रकरण बाहेर आले असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तथापि, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांना उद्या (दि.१८) डिसेंबर रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे उद्या गोटे पोलीस स्टेशनला हजर राहणार का ? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटल्यानुसार, भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी तापी पात्रात केलेले अतिक्रमण नजरेखालून घालण्याकरीता अनिल गोटे व्यक्तीश: गेले होते. तेथे असलेल्या आदिवासी चौकीदाराला गेट उघड एवढी सुद्धा विनंती केली नाही. त्या विचाराने माझी गाडी पाहतात गेट उघडले. त्यांचे मॅनेजर यांनी आपले नाव गिरासे असल्याचे सांगितले. त्या विचाराने सभ्यतेला अनुसरूनच आपल्याकडे असलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. त्याच प्रमाणे, थोड्याफार फरकाने पाणी घेणार का? वगैरे विचारणा केली. एवढेच नव्हे तर, अन्ना साहेब मी तुमच्या मल्हार बागेवर येऊन गेलो आहे. तुमच्या दारावरच बोर्ड आहे. पण मला कोणीच कळत नाही. मी स्वतः फिरून मल्हार बाग पाहिली आहे. तरी पण जयकुमार रावल यांनी त्याला फोन करायला लावून शेजारी उभे राहून प्रॉमपटिंग करत आम्ही आपल्या स्वागताला तयार आहोत, तुम्ही या असे सागितले. दिनांक १५ डिसेंबर रोजी टाकरखेडा गावातील तीन-चार कार्यकर्त्यांचे मला फोन आले. (जे पोलिस तपासात मी डिस्कस करीन) अण्णासाहेब तुम्ही गेल्यानंतर २० मिनिटांनी जयकुमार रावल आले, पण आमच्याकडे तुमचा नंबर नसल्यामुळे आम्ही तुम्हाला सावध करू शकलो नाही, तुम्ही आला असता तर आम्हीच तुम्हाला जावू दिले नसते.
ही वस्तुस्थिती असताना रक्त दोषानुसार जयकुमार रावल यांनी थयथयाट करुन नेहमीप्रमाणे त्या गरीब कर्मचाऱ्यांच्या नावाने पोलिस तक्रार करून आपल्या डरपोकपणाचा दाखला दिला आहे. मला अजूनही कळत नाही की, अशी कुठली गोष्ट आहे कि ती लपवून ठेवावी? गाव लोकांच्या तक्रारी रास्ता आहेत किंवा नाहीत एवढीच खातरजमा करण्याकरिता मी माझ्या दोन सहकाऱ्यांसह गेलो होतो तरीही पोलिसांना तुकडे टाकून, दबावाखाली आणून बोगस तक्रारी करून रावल यांनी नेहमीप्रमाणे अखंड दांडवते तयार केला.
कुत्र्याच्या मालकाला मी अजुन दगड काय, डोळा सुद्धा मारला नाही. तोपर्यंत कधी काळी माझ्या तुकड्यावर शेपटी हलवणारे कुत्री भुंकायला लागली. सगळ्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या मी मनोमन स्वागत करतो. जन्माला घातलेल्या प्रत्येक प्राण्याला एक खास वैशिष्ट्य निसर्गाने दिले आहे. कुत्री जोड तुकडे टाकलेल्या मालकाशी इमानदार राहणार नसतील तर जनतेचा निसर्गावर चा विश्वासच उडून जाईल. त्यामुळे त्यांना मी अजिबात दोष देत नाही. पण एक बरे झाले की स्वतः जयकुमार रावल नी बोंबाबोंब करून मला अपेक्षित असलेली संधी मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी पोलिस तक्रार केली नसती तर, एवढे मोठे प्रकरण बाहेर काढण्याची एक संधी माझ्या आयुष्यातून मला गमवावी लागली असती. आता तक्रार केलीच आहे तर, मलाही कायद्याचा सन्मान करून, कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यकच आहे. दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे हजर होणार आहे. असे पत्रक धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रभारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आज उशिराने प्रसिद्धीस दिले आहे.