धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर परिसरात पत्ते खेळण्याच्या वादातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात गणेश शांताराम माळी (वय 25 वर्षे धंदा रसवंती चालक रा.लहानमाळी वाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास माझा भाऊ योगेश यास पाहण्यासाठी संजयनगर मधील हनुमान मंदीर येथे गेलो होतो. त्याठिकाणी माझा भाऊ योगेश व त्याचा मित्र किशोर मराठे हे मला दिसले. त्यावेळी मी त्यांना तुम्ही पत्ते खेळायला आले आहेत का, असे विचारले असता त्यांनी मला, नाही असे म्हणुन ते दोघे तेथुन निघुन गेले. त्यानंतर मी देखील तेथून परत निघत असतांना अनिल सुभाष फराटे (महाजन) याने मला येवुन धक्का देवून खाली पाडुन माझे कानशिलात मारले. तो मला म्हणाला की, तु आल्यामुळे गेम खराब झाला. तेव्हा मी खाली जमीनवर पडलेलो असतांना छोटु चौधरी, बाळया सुका महाजन, गजानन तुकाराम महाजन, दुदुकाला (मुळ नाव माहीत नाही) अशांनी येवुन मला लाथाबुक्यांनी मारहान केली. त्यावेळी गजानन तुकाराम महाजन याने त्याच्या हातातील फायटरने माझ्या तोंडावर, डाव्या डोळयावर मारुन दुखापत करुन जखमी केले. आमच्या मार्गात आला तर तुला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली. त्यावेळी माझ्या गल्लीतील विक्की चोधरी व कैलास राजु महाजन अशांनी येवून माझी त्यांचे पासुन सोडवणुक करीत असतांना विक्की चौधरी व कैलास महाजन यांना देखील त्यांनी मारहाण केली आहे. त्यांनी मला कसेबसे त्यांचे तावडीतुन सोडविले तोपर्यंत तेथे माझे मित्र चेतन मधुकर शिंपी, समाधान शिवदास देवरे, गोकुळ काशिनाथ पाटील, हेमु सुकलाल चौधरी अशांनी येवून मला त्यांच्या सोबत धरणगाव पोलीस स्टेशनला घेवून आले. मला झालेल्या मारहाणीत डोळयाला व तोंडाला दुखापती झाली. याबाबत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.