जळगाव (प्रतिनिधी) येथील ऑर्कीड मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांचे आरोप निराधार असल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
लोहारखेडा येथील अरूण रामकृष्ण वाघ (वय ४२, रा.लोहारखेडा) यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने दाखल झाले होते. १३ एप्रिलला त्यांचा कोविडचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यांना व्हेंटीलेटरवर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. १ मे ला त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने नान कोविड आयसीयू वार्डात त्यांना शिफ्ट केले होते. आज सकाळी त्यांचे ऑक्सीजन लेव्हल ९५ होती. दूपारी एकच्या सुमारास आम्ही रुग्णाच्या कक्षात गेलो असता तेथील सर्व लाइट बंद होते. व्हेंटीलेटर बंद होता. स्टाफ, डॉक्टर जागेवर नव्हते. आम्ही आरडाओरड केल्यानंतर स्टाफ आला. त्यांनी रुग्णाच्या छातीवर पंपीग केले. त्यात आमचा रुग्ण मृत झाल्याचा आरोप नातेवाईक सुनिल पवार यांनी केला. रुग्णाजवळ स्टाफपैकी कोणी असती अन तयाची काळजी घेतली असती तर रुग्ण वाचला असता. हॉस्पीटलच्या डॉक्टर, स्टाफचा निष्काळजीपणाने आमचा रुग्ण मृत झाला. याप्रकरणी रुग्नांच्या नातेवाईकांनी म्हंटल कि, गून्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही.
दरम्यान याबाबत रुग्णालयात उपचार करणारे डॉ. देवेंद्र पाटील म्हणाले की, रुग्ण आल्यापासून क्रिटीकल होता. त्याबाबत वारंवार आपण रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिलेली होती. आज सकाळीही तशीच कल्पना दिली. रुग्ण दुसरीकडे शिफ्टचाही सल्ला दिला होता. रुग्णाची ऑक्सीजन पातळी नेहमी ७० ते ७५ असायची. रुग्णाच्या नातेवाईकांचे आरोप निराधार आहे.