धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकाची १ सप्टेंबर १८६६रोजी स्थापना झाली होती. नगरपालिकेचा १५६ वा वाढदिवस सर्व कर्मचारी वर्ग अधिकाऱ्यांनी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतू गावातील बहुतांश राजकारण्यांना पालिका स्थापना दिनाचा विसर पडल्याचे चित्र होते. एरवी दररोज सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करतात. सोशल मीडियात डीचक येईल एवढे शुभेच्छा टाकतात. मग मग पालिकेचा का नाही?. पालिका फक्त आर्थिक ओरबाडण्यासाठीच आहे का?. असा संतप्त सवाल आता धरणगावकर विचारत आहेत.
धरणगाव नगरपालिकाची १ सप्टेंबर १८६६रोजी स्थापना झाली होती. नगरपालिकेचा १५६ वा वाढदिवस सर्व कर्मचारी वर्ग अधिकाऱ्यांनी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याधिकारी जनार्धन पवार, प्रणव पाटील, योगाराज तळेराव राजू माळी ,संजय शुक्ला, किशोर खैरनार निलेश वाणी अनुराधा चव्हाण नारायण माळी, युवराज चौधरी पुनीत थोरात, किरण पाटील, प्रवीण देशपांडे, गणेश पाटील, अशोक चव्हाण, शिरीष पाटील विनोद रोकडे, रितेश जोशी भगवान माळी, रविकांत वाघमारे , जितेंद्र वाघमारे, महेश चौधरी श्रीमती करंदीकर , सिकंदर पवार प्रशांत चौधरी मोहन महाजन मुजमिल यांच्या सह कर्मचारी वर्ग व आधिकारी वर्ग उपस्थित होते.
तर दुसरीकडे दररोज कोणत्या आणि कोणत्या कार्यकर्त्याचा वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर शुभेच्छा देत दिवसाची सुरुवात आणि शेवट करणारे नेत्यांना पालिकेचा १५६ व्या वाढदिवसाचा कसा विसर पडला?. आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांपैकी कुणीही सोशल मिडीयावर व्यक्त झाले नाही की, कोणता कार्यक्रम घेतला नाही. दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज सोशल मीडियात एकमेकाला चिमटे घेतले जाताय. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष भूषण मिरवले जातात. मात्र, पालिकेचा १५६ वा वर्धापनदिनाचा विसर पडतो, हे कितपत योग्य?, असा सवाल देखील सुज्ञ नागरिक विचारात आहेत.
















