
धरणगाव (प्रतिनिधी) – आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या उधना–मिरज (पंढरपूर) विशेष रेल्वेचे धरणगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना व युवासेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रतापराव (प्रतापभाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
विशेष रेल्वे धरणगाव स्थानकावर दाखल होताच वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले. अल्पावधीत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाला वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सेवाभावातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी प्रतापभाऊ पाटील यांच्यासह दिनेशभाऊ कडोसे (पाळधी), गोपालभाऊ (बांभोरी), दीपकभाऊ भदाणे (बिलखेडा), गणेशभाऊ भिंगणे (श्यामखेडा), रोहितभाऊ पाटील (बाभळे), मंगेशभाऊ पाटील (बाभळे), राजभाऊ वाघरे (धरणगाव), नयनभाऊ वाघरे (धरणगाव), भावेशभाऊ पाटील (गारखेडा), योगेशभाऊ पाटील (गारखेडा), जिग्नेशभाऊ पाटील (गारखेडा), प्रवीणभाऊ पाटील (बाभळे), रोनकभाऊ पाटील (बाभळे), राजभाऊ माळी (धरणगाव), बंटीभाऊ भदाणे (बिलखेडा) यांच्यासह धरणगाव तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाच्या सेवेला प्राधान्य देत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याची परंपरा कायम ठेवणाऱ्या शिवसेना व युवासेनेच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले.














