
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात यंदा पारंपरिक कापूस लागवडीऐवजी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका पिकांना पसंती दिली. जून-जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अपेक्षेइतके नसतानाही उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी पिके जोपासली. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीन आणि मका पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसला असून, उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे सातत्य राहिले नाही. जून आणि जुलैमध्ये काही भागांत झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, कपाशी आणि तूर या पिकांची लागवड केली. सुरुवातीला जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक होती. मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी पिकांची वाढ मंदावली असून, अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या स्थितीत आली आहेत.
सोयाबीनसोबतच मक्यालाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील मका पिकाला जमिनीत पुरेसा ओलावा मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत मका पिकाची पाने सुकण्यास सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादन गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यलो अलर्टनंतरही पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यात हवामान विभागाने ३ आणि ४ सप्टेंबर रोजी पावस यलो अलर्ट जारी केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्ल झाल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. अनेक भा पावसाची नोंदही झाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम् पुढील काही दिवसांतही पावसाची ठोस शक्यता कमी असल्याने स हंगामातील पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. पावसाअ कपाशी आणि तूर पिकांची वाढही खुंटली आहे.
पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू
जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच पावसान मोठा खंड पडल्यामुळे कापूस पिकाची वाढ आणि बोंडधारणेच्या प्रक्रि बदल झाला आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यंदा पूर्वहंगामी काप-वेचणी तब्बल आठ ते दहा दिवस लवकर सुरू झाली आहे. मे महिन्य लागवड केलेल्या कपाशीची वेचणी काही भागांत सुरू झाल्याने शेतांमध्ये कापूस वेचणीची लगबग पाहायला मिळत आहे.
















