धरणगाव (प्रतिनिधी) उत्तम पुस्तके ही सामाजिक प्रबोधनाबरोबरच माणसाच्या अंगी माणुसकीची मशागत करत असतात. जर चांगली माणसं ओळखायची आणि वाचायची असतील तर उत्तमोत्तम पुस्तके वाचली पाहिजेत. नव्हे तर ती संग्रहित ठेवली पाहिजेत कारण पुस्तके हीच खरी निखळ मैत्री टिकवित असतात, असे प्रतिपादन मुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी पी.आर.हायस्कूल मध्ये माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी मंचावर एनसीसी मेजर डी.एस.पाटील, ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ आणि गणिताचे तज्ज्ञ शिक्षक उमाकांत बोरसे हे उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डी. एच. कोळी यांनी केले. पी.जी.पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजेंद्र पवार, योगेश नाईक आणि मिलिंद हिंगोणेकर यांनी सहकार्य केले.