TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले : आमदार मंगेशदादा चव्हाण !

vijay waghmare by vijay waghmare
May 4, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या ५० वर्षात गिरणा व मन्याड धरणानंतर गिरणा नदीवरील वरखेडे धरण केवळ मोदी सरकारमुळे पूर्ण होऊ शकले, असे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. ते सायगाव उंबरखेड गटाचा मांदुर्णे येथील भाजपा महायुतीचा भव्य मेळावा बोलत होते.

सायगाव उंबरखेड गटाचा भाजपा महायुतीचा भव्य मेळावा शुक्रवारी मांदुर्णे येथे संपन्न झाला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. आता त्यांनी ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प केला आहे. गेल्या १० वर्षात देशात रस्ते, रेल्वे, तंत्रज्ञान या क्षेत्रात झालेले बदल आपल्याला दिसत आहे. गेल्या ५० वर्षात आपल्या गिरणा खोऱ्यात गिरणा मोठे धरण व मन्याड प्रकल्प हे दोनच प्रकल्प होते. मात्र २० वर्षांपासून मंजूर असलेला गिरणा नदीवरील वरखेडे धरण सारखा प्रकल्प केवळ मोदीजींच्या सरकारने बळीराजा जलसंजीवणी योजनेतून एकरकमी निधी दिला म्हणून पूर्ण होऊ शकला.

READ ALSO

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

पुढील काही महिन्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेले वरखेडे धरण बंदिस्त पाईपलाईन काम, गिरणा डावा व मन्याड उजवा कालवा पाटचाऱ्या काँक्रीटीकरण काम पूर्ण करून तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार चव्हाण म्हणाले. अयोध्येत राम मंदिर उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले. आपली राम सेना आहे तर दुसरीकडे त्यांची रावण सेना आहे. इंडी आघाडी वाले दहा तोंडी रावण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पराभव करण्यासाठी टपून बसले आहेत. त्यामुळे रामाला तंबूतून मंदिरात विराजमान करणाऱ्याला आपल्याला विजयी करायचे आहे, असे आवाहन देखील आमदार चव्हाण यांनी यावेळी केली.

यावेळी गटातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना भरघोस मताधिक्य देण्याचा संकल्प सर्वांनी केला. यावेळी भाजपा, शिवसेना, रिपाई, मनसे, एकलव्य संघटना आदी मित्र पक्षांचे पदाधिकारी, आजीमाजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

May 7, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
Next Post

एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतात काम करताना अचानक कोसळली वीज ; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !

September 22, 2023

ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसाठी ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीच ठिय्या आंदोलन

April 20, 2021

वडापावमध्ये विष कालवून पत्नी- मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न !

August 21, 2023

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

December 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group