TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कमंडलवादास धक्का !

वाचा : ज्येष्ठ पत्रकार विजय महाले यांचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर सणसणीत भाष्य करणारा लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (विजय महाले) निवडणुकीच्या तोंडावर संधीसाधूंकडून पक्षांतराचा अध्याय कोठेही अपवाद ठरत नाही. तिकीट कापले जाणार, या भीतीपोटी पक्ष सोडला, असा युक्तीवादही केला जातो. मात्र, उत्तर प्रदेशात स्वामी प्रसाद मौर्य यांच्या रूपाने सुरू झालेले पक्षांतर सत्ताधारी भाजपच्या ओबीसी वोटबँकला केवळ धक्का देणारे नाही; मतांना स्वार्थासाठी वापरून कमंडलवाद दामटणाऱ्या मानसिकतेला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे.

‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ अशी घोषणा देत उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणाची दिशा बदलत ‘केडर बेस’ बहुजन समाज पक्ष (बसप) बनविण्याची किमया कांशीराम यांनी केली. त्यांच्यात छत्रछायेखाली राजकारणाचे धडे गिरविलेल्या स्वामीप्रसाद मौय यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर २०१६ मध्ये ‘बसप’शी काडीमोड घेतला होता. कांशीराम यांच्या राजकीय नाऱ्याचा मायावती यांच्या नेतृत्वाखालील ‘बसप’ला विसर पडल्याचा शंखनाद त्यांनी त्यावेळी केला होता. मायावती यांचे निकटवर्तीय नेते अशी त्यांची त्यावेळी प्रतिमा होती. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना मौर्य हे ‘बसप’कडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर मायवती यांनीच त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले होते. २०१६ च्या नोटबंदीनंतर मायावती यांचे बंधू आनंदकुमार यांच्यावर आयकर विभागाच्या कारवाईमुळे ‘बसप’ची आर्थिक कोंडी झाली होती. त्यापाठोपाठ मौर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत ‘बसप’ला मोठा राजकीय धक्का दिला होता. अर्थात, तेव्हाही भाजपमध्ये जाण्यासाठी मौर्य यांनी काही काळ घेतला होता. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मौर्य यांनी भाजपमध्ये इतर मागासवर्ग, दलित, शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळत नसल्याची टीका केली आहे.

READ ALSO

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

शिवसेनेच्या चार नवीन उपनेत्यांची घोषणा

भाजपला सोडचिठ्ठी देणारे मौर्य हे एकमेव नेते नाहीत. त्यांचेच निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भगवती सागर, रोशनलाल, ब्रिजेश प्रजापती तसेच दारासिंह चौहान यांनी देखील राजीनामा देत समाजवादी पक्षाशी घरोबा केला आहे. फक्त मौर्यच नव्हे तर या सर्व नेत्यांचे स्वतंत्र स्थान आहे. भगवती सागर हे बिल्हौर येथून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्यामुळेच भाजपला पहिल्यांदा बिल्हौरमधून एक लाखांपेक्षा अधिक मते मिळत जिंकता आले होते. सर्वसमान्यांप्रमाणे शेती करणारा आणि तिल्हार येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेला अशी रोशनलाल यांची वेगळी ओळख आहे. तर तिंदवारीमधून निवडून येत पहिल्यांदाच आमदार झालेले ब्रिजेश प्रजापती खाण माफियांविरोधात मोठा लढा दिलेला आहे. मौय किंवा कुशवाह म्हणजेच आपल्याकडे महाराष्ट्रात माळी समाज होय. उत्तर प्रदेशात मौर्य समाजाची जवळपास ६ टक्के मते आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पाठोपाठ पर्यावरण मंत्री दारासिंह चौहान यांनी सुद्धा भाजपला रामराम केला आहे. राज्यातील नोनिया राजपूत या ओबीसींमध्येच गणल्या जाणाऱ्या चौहान यांचा पूर्वांचलमध्ये सर्वाधिक प्रभाव आहे. सुमारे ८-९ कोटी म्हणजेच सुमारे तीन टक्के मतदार चौहान यांचा शब्द प्रमाण मानून मताधिकार वापरतात, असे मानले जाते. राजकीय दृष्ट्या इतक्या वजनदार नेत्यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असतांना पक्षांतराचा धाडसी निणर्य का घेतला, असा प्रश्न कुणालाही पडेल.

स्वामी प्रसाद मौर्य किंवा त्यांना मानणारे, निकटवर्तीय नेते भाजप सोडून जातात, यात गर्भित अर्थ लपलेला आहे. २०१७ मध्ये याच आणि अजून अन्य घटकांना सोबत घेत भाजपने राजकीय गोळाबेरीज घडवून आणली होती. त्यामुळे भाजपला सुमारे ४० टक्के मते मिळू शकली होती. त्या निवडणुकीत ‘बसप’ आणि ‘सप’ या दोन्ही पक्षांच्या वाट्याला अनुक्रमे २२ व २१ टक्केच मते गेली होती. अर्थात, भाजपच्या या मताधिक्यात विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कोणतेही योगदान नव्हते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तरीही केवळ ठाकूर या उच्च वर्णीय जातीतील असल्याने अन्य नेत्यांपेक्षा योगी यांना वरचढ स्थान मिळाले. समाजास प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याचे दाखविण्यासाठी स्वामी प्रसाद मौर्य आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मंत्रिपद मिळाले. विशेष बाब म्हणजे केशव यांच्या तुलनेत स्वामी यांची राजकीय उंची अधिक आहे. विश्व हिंदू परिषदेचे काम करणाऱ्या केशव यांच्यापेक्षा ‘बसप’च्या माध्यमातून तळागाळापर्यंत काम केलेले असल्याने स्वामी प्रसाद मौर्य यांची ‘मास लीडर’ अशीच प्रतिमा आहे. असे असताना मिळालेले मंत्रिपद जनतेच्या उपयोगासाठी वापरता येत नाही, अशी खंत मौर्य यांनी व्यक्त करणे हे भाजपचा कारभार हुकुमशाही पद्धतीने सुरू असल्याच्या आरोपांना बळ देणारेच आहे.

विकासासोबत जातीचे राजकारण करण्यात तरबेज असलेल्या भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. बहुचर्चित कृषी विधेयकाविरोधात दिल्लीत वर्षभर झालेल्या आंदोलनाची धग उत्तर प्रदेशापर्यंतही पोचली आहे. त्यात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडण्याचा मुद्दा शीर्ष नेतृत्वाने उत्तर प्रदेशात ‘जणू काही घडलेच नाही’, अशा पद्धतीने हाताळल्याने जनआक्रोश फुटण्याची चिन्हे आहेत. हाथरस प्रकरणात दलित युवतीची अत्याचार व हत्या म्हणजे राज्यात जंगलराज शाबूत असल्याचे दाखवून देणाराच ठरला. करोनामुळे रोजगार, आरोग्य, स्थिरता या सर्व पातळीवर फटका बसलेला असताना मूलभूत मुद्यांवर बोलण्यापेक्षा सत्ताधारी भाजप आनंदीआनंदी असल्याचे गुलाबी चित्र रंगविले जात आहे. अयोद्ध्या, काशी विश्वनाथ यासह मथुरेतही राम मंदिर उभारणीची गर्जना भाजपने केली आहे. राज्यात ८० टक्के विरुद्ध २० टक्के अशी विखारी वक्तव्ये करताना मुख्यमंत्री योगी यांनी ओबीसी मतांना आपल्यासोबत असल्याचे परस्पर ठरवून टाकले. असे गृहित धरणेही एकवेळ चालेल. मात्र, या मताधिक्यास केवळ निवडणुकीत जवळ करणार आणि सत्तेत दुय्यम स्थान देणार ही खदखद राज्यात वाढते आहे. सातत्याने वाढत जाणारे इंधनदर, घटलेले उत्पन्न, महागाई यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. तेव्हा लोकांपुढे कोणत्या तोंडाने मते मागायला जायची, असा प्रश्न मौर्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पडला असेल. त्यामुळेच आता स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपच्या मंडलवादाशी फारकत घेत अखिलेश यादव यांच्या मंडलवादी राजकारणाशी हातमिळविणी केली आहे. भाजप सोडल्याचा परिणाम केवळ आताच नाही २०२२ नंतरही दिसेल, असा मौर्य यांनी केलेला दावा २०२४ मध्येही त्रासदायक ठरणार का, याची उत्सुकता आहे.

ज्येष्ठ पत्रकार विजय महाले यांच्या फेसबुक वॉलवरून साभार !

विजय महाले
99229 10743

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
जळगाव

शिवसेनेच्या चार नवीन उपनेत्यांची घोषणा

June 5, 2025
जळगाव

जिभेने चित्र रेखाटणाऱ्या राशीचे विलक्षण कौशल्य; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

June 5, 2025
जळगाव

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

May 30, 2025
जळगाव

जळगाव एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; ऐतिहासिक निर्णय

May 29, 2025
भुसावळ

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ येथील संतोष मराठे यांची निवड !

May 24, 2025
Next Post

गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह संशयित जेरबंद ; जामनेरात एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेसाठी इच्छुकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

July 16, 2021

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी यांचे अभिनंदन !

August 12, 2023

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

January 27, 2021

जे परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?: नारायण राणे

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group