पातोंडा (प्रतिनिधी) रामायण म्हणजे सर्व तीर्थ काशी आणि त्याच्यावरही सर्व तीर्थ म्हणजे आई बाप असे प्रतिपादन इंदोरीकर महाराज यांनी पातोंडा येथील आयोजित केलेल्या जाहीर कीर्तनात केले. कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
पातोंडा येथील श्रीराम सुखदेव बिरारी यांचा मुलगा व यु.पी.एल. सिड्स कंपनीचे संदिप बिरारी यांच्या पत्नीला कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. त्यांचे सर्व रिपोर्ट निल आल्याने त्यांनी इंदोरीकर महाराजांचे कीर्तनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संदिप बिरारी यांनी सहपरिवार महाराजांचा सत्कार केला. यावेळी जळगाव जिल्ह्यासह इतर ही भाविक लहान मुलांसह पुरुष व महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा नियोजनानुसार ठीक पाच वाजता सुरू करण्यात आला. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी भाविकानां उपदेशाचे डोस पाजत जिवन रिलॅक्स जगावे, चिंता करू नये, माणसाने काळजी जगण्यासाठी नये तर आनंदासाठी करावी, कोरोना नंतर आता मोबाईल मुळे ८०% लोकांना दृष्टिदोष आला आहे. मोबाईलचा अतिवापराने लोकांचा संवाद संपला आहे. मनोरुग्ण झाले आहेत. यावेळी महाराजांनी सध्याच्या परिस्थितीवर विनोदी भाष्य करत प्रेक्षकांना खदखदून हसवले. यावेळी तालुकास्तरावरील आजी – माजी आमदारांसह बहुसंख्य राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. व गावातील स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली. यावेळी पोलीस विभागासह आरोग्य विभागाने सहकार्य केले.