मुंबई (वृत्तसंस्था) ‘सामना’ तून सातत्याने गलिच्छ भाषेत लिखाण केले जात असल्याने आपण संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी रश्मी ठाकरेंना पत्र पाठवल्यांची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. यामध्ये पाटील यांनी लिहिलं की, ‘मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सुसंस्कृत आहात. त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल. पण ती भाषा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा. असं पत्रात म्हटलं आहे.
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधण्यात आला होता. त्यावरुन, चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. त्यानुसार, पाटील यांनी आज रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं असून ते सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही करण्यात आलंय. त्यामुळे, आता रश्मी ठाकरे या पत्राची दखल घेणार का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरास काँग्रेसचा विरोध असल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यानंतर पाटील यांच्याबाबत सामनातून गलिच्छ भाषा वापरली गेली होती. त्यावरुन पाटील यांनी रश्मी ठाकरे यांनी पत्र लिहून आपले मत व्यक्त केलं. यामध्ये पाटील यांनी लिहिलं की, ‘मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सुसंस्कृत आहात. त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल. पण ती भाषा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा. सामनात जे जे लिहिलं जात त्याला तुमची सहमती आहे असं होतं. सहमती असेल तर माझी काही हरकत नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.
या पत्रावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना कंम्प्टेंट असं रुप दिलं आहे. सामना आम्ही नेहमीच वाचतो, आमच्यावरी टीकेशिवाय त्यात फार काही नसतं. या प्रकरणावर संजय राऊत घाबरत नाही असं म्हणाले होते, पण ते रश्मी वहिनींना घाबरत नाहीत, असे म्हणत असावेत; असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
















