रावेर (प्रतिनिधी) कर्जोत गावाजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुनिल नारायण हरिजन (वय ३५) आणि अनिल नारायण हरिजन (वय २३) असे मयत झालेल्या दोघां भावांची नावे आहेत.
खंडवा(मध्य प्रदेश ) येथील एक परीवार कर्जोत (ता. रावेर) जवळ कामानिमित्त आला होता. सुनिल हरिजन आणि अनिल हरिजन हे या भीषण अपघातात ठार झाले आहेत. दोघांचे लग्न झाले होते आणि त्यांना मुले देखील असल्याचे कळते. तर दोघांचे वडील भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहीती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले असुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.