जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी बाजार समिती अंतर्गत भाजीपाला मार्केटच्या लिलावात खरेदीला रिक्षा घेवुन आलेल्या विक्रेत्याची ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरू नेल्याची घटना पहाटे ५:३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, जुना खेडीरोड स्थीत ज्ञानदेवनगरात वास्तव्यास असलेल्या गोपाल युवराज चौधरी (वय-३५) नेहमी प्रमाणे पहाटे साडे पाच वाजता त्यांची ऑटो रिक्षा (एमएच१९व्ही.३६८८) घेवुन भाजीपाला मार्केटमध्ये आले. सोशल डिस्टन्सींग मुळे वाहने आत आणण्यास बंदी असल्याने त्यांनी ऑटो रिक्षा मार्केट बाहेर रोहिणी स्वीट दुकानाबाहेर उभी केली होती. भाजीपाला खरेदी करुन परत आल्यावर रिक्षा त्या जागी नसल्याने, रिक्षाचा शोध घेतला मिळून न आल्याने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी विक्रेत्यानी तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास मुद्दस्सर काझी करत आहेत.