धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याच्या कामास आज सकाळपासून सुरुवात झालीय. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळपासून कामाला सुरुवात झाल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा मराठा नेते पी.एम. पाटील सर यांनी दिली आहे.
धरणगाव शहरातील उड्डाण पुलावर काही दिवसांपासून खड्डे पडलेले होते. त्यामुळे वाहन धारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा मराठा नेते पी.एम. पाटील सर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एन निवेदन देत तात्काळ खड्डे न बूजल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. पी.एम. पाटील यांनी निवेदनात म्हटले होते की, धरणगाव उड्डाणपुलावर अनेक दिवसापासून खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे भविष्यात अपघात होऊन अनुचित प्रकार घडू शकतो. सर्वात जास्त रहदारीचा हा उड्डाणपूल असून छोटे-मोठे अपघात यापूर्वी झाले आहेत. परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. वेळोवेळी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर पूर्वकल्पना देऊन सुद्धा पावसाचे कारण दाखवून खड्डे अद्याप बुजवले गेले नाहीत. त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करावे अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांनी दिला होता. एवढेच नाव हे तर त्यांनी याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावत तात्काळ खड्डे बुजण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार आज सकाळपासून युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्यात आले. दरम्यान, खड्डे बुज्ल्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.