नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शेतकरी आंदोलनच्या च्या समर्थनात संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडली. गाडीत बसून पिस्तुल रोखून गोळी झाडून घेतली. सिंधु बॉर्डरवर ते शेतकऱ्यांना कंबल वाटण्यासाठी आले होते.
देशभरात शेतकरी आंदोलनं अधिक गंभीर वळण घेत असून यादरम्यानच एका घटनेनं पुन्हा एकदा या आंदोलनानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिंघु बॉर्डर इथं सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांच्याच समर्थनार्थ स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. संत बाबा राम सिंह यांना ‘सिंगडा वाले बाबा’ या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांचा डेरा, म्हणजेच संस्थान हे करनाल जिल्ह्यातील निसंगपाशी असणाऱ्या सिंगडा या गावी आहे. संत बाबा राम सिंह ‘सिंगडा वाले’ म्हणूनच त्यांची ओळख होती. जगभरात ते प्रवचनासाठी जात असत. नानकसर संप्रदायाशी ते संलग्न होते. सध्या सुरु असणारी शेतकरी आंदोलनं आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांमुळं ते बरेच निराश होते. बाबा राम सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिल्याचं म्हटलं जात आहे. जयपूर – दिल्ली महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावेळी बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्याआधी सुसाइड नोट लिहिली. यात बाबा राम सिंह यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या वेदन पाहवत नाहीत. तसेच अन्याय सहन करणे हेही पाप आहे. हे पाहणेही पाप आहे आणि हे सर्व सहन होत नाही आणि सहन करणेही पाप आहे. मी शेतकऱ्यांना सांगतो, ही स्थिती पाहवत नाही. सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिलेले आहे, ‘काहींनी शेतकऱ्यांचे हक्क आणि जुल्म यांच्याविरोधात आपले सम्मान प्राप्त पुरस्कार परत केले आहेत. आज शेतकरी हक्कासाठी आणि सरकारच्या अन्यायाच्याविरोधात मी आत्महत्या करत आहे. हा अन्यायाविरोधात आवाज आहे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी मी हा आवाज आहे. ‘वाहेगुरु जी का खालसा ते वाहेगुरु जी की फतेह.’
या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक शेतकरी आंदोलन करत आहे. आज एका शेतकऱ्यांने आपले बलिदान दिले आहे. मोदी सरकारच्या क्रौर्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हटवादीपणा सोडून द्या आणि कृषी-विरोधी कायदा त्वरित मागे घ्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.