धरणगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ गांधीवादी, साहित्यीक तथा समाजसेवक डॉ. देवरामभाऊ श्रीपत नारखेडे यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले. ते ९९ वर्षाचे होते. विशेष म्हणजे देवरामभाऊ नारखेडे यांनी ८० व्या वर्षी पीएच.डी. संपादन केली होती.
देवरामभाऊ नारखेडे (वय ९९) हे मूळचे साळवा (ता. धरणगाव) येथील रहिवासी आहे. त्यांचे एम. एस्सी. अॅग्रीकल्चर इतके शिक्षण झाले होते. गांधीवादी विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी अनेक सामाजिक कामांमध्ये भाग घेतला. १९६० साली साळवा येथे एकाच वेळी आठ जणांच्या खुनाचे प्रकरण घडले. यात देवरामभाऊ यांचे नाव देखील होते. यात त्यांना फाशीची शिक्षा झाली. पण निरपराध देवराम नारखेडे यांच्या बाजूने देश-विदेशातील मोठी मंडळी उभी राहिली. यात आचार्य विनोबा भावे, काकासाहेब गाडगीळ आदींसह अनेक मान्यवरांचा समावेश होता. यातून अखेर राष्ट्रपदींच्या स्वाक्षरीने त्यांची मुक्तता झाली होती. अलीकडच्या काळात ते आपल्या नातवासोबत नाशिक येथे वास्तव्याला होते. आज सकाळी त्यांचे अकस्मात निधन झाले. डॉ. देवरामभाऊ यांच्या पार्थिवावर आजच नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.