TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून !

vijay waghmare by vijay waghmare
March 22, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून झाल्याची घटना समोर आली आहे. एक घटना ही तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात उपसरपंच या तरुणाचा किरकोळ वादातून निर्घुण खून केल्याची घडली. तर दुसरी घटना भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असलेल्या तरूणाची क्रूर हत्या करून गाडून टाकण्यात आले.

तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात ३५ वर्षीय माजी उपसरपंच या तरुणाचा किरकोळ वादातून निघून खून झाल्याची घटना शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी ८ वाजता कानसवाडा शिवारातील शेतात घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असुन या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी याचे ढाब्यावर भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत वाद झालेला होता. त्यानंतर याच कारणावरून गुरुवारी २० मार्च रोजी रात्री १० वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात वाद झाला. हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. कोरोना काळात २०२१-२२ मध्ये युवराज कोळी हे कानसवाडा येथे उपसरपंच होते. त्यावेळी भरत पाटील व त्यांचा मुलगा परेश पाटील हे त्यांचे परमिट रूम वेळे पेक्षा जास्त वेळ सुरू ठेवत असल्याने त्यांना बोलण्यास गेलेल्या उपसरपंच युवराज कोळी यांचा संशयितांशी वाद झाले होते. झाले होते. त्यांनतर देखील त्यांच्यात वाद झाले. तसेच दि. २० रोजी देखील त्यांच्यात वाद झाले. या प्रकरणाला ठेकेदारीची देखील किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास युवराज कोळी हा त्याची आईवडील यांच्यासोबत कानसवाडे शिवारातील शेतात काम करत होता. त्यावेळी संशयित आरोपी भरात पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी याच्यावर वार केले. दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर वारमुळे युवराज जागेवरच कोसळला.

भुसावळ येथे सराईत गुंड मुकेश भालेरावची हत्या
शहरातील टेक्निकल हायस्कूल मागे राहणाऱ्या मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द ही केले होते. यातून बाहेर आल्यानंतर मुकेश भालेराव हा भुसावळ येथेच वास्तव्याला होता. दरम्यान, सुमारे चार दिवसांपूर्वी मुकेश भालेराव याला घरून काही तरूण घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेऊन ही तो न मिळाल्याने आज सकाळी भालेराव याची पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. दरम्यान, आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुकेश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुकेश भालेराव याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुकेश भालेराव याच्या खुनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या कृत्यामागे पूर्व वैमनस्य असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुकेश भालेराव याची टोळी असून त्यांच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याची हत्या ही टोळीयुध्दातून झाल्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपासातून यातील सत्य समोर येणारच आहे. या खुनामुळे भुसावळात मध्यंतरी बंद झालेले टोळी युध्द पुन्हा सुरू झाले की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पूर्व वैमनस्यातून हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी खुनाचा हा गुन्हा उघडकीस आणला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

November 1, 2025
चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
जळगाव

६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

November 1, 2025
गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

October 31, 2025
जळगाव

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

October 31, 2025
Next Post

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरच्या जवानाचा आसाममध्ये अपघाती मृत्यू ; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार !

May 17, 2023

बकालेंकडून इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करण्याची धमकी अन् कलेक्शनची व्हायरल झालेली कथित यादी !

October 14, 2022

जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटक्या शैलीत शुभेच्छा

August 5, 2021

St Bus Accident : सोलापूरमध्ये एसटी बस अपघात, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर !

July 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group