जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत के श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि.प. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. दरम्यान, या वृत्तामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, तालुक्यातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत के श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा या शाळेत शालेय पोषण आहार योजना सुरु झाल्यापासून सदर शाळेने शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेतलेला असून शासनाकडुन पुरविण्यात येत असलेला तांदुळ पुरवठादाराकडुन पुरविण्यात येत असलेला धाण्यादी माल स्विकारलेला आहे. तसेच इंधन खर्च, भाजीपाला खर्च, अन्न शिजविण्याचा खर्च व पुरक आहार या सर्व बाबींचे शासन स्तरावरुन आलेले शासकीय अनुदान या सर्व बार्बीपासुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवून त्याचा योग्य विनीयोग न करता शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून संपूर्ण योजनेचा शासन स्तरावरुन आलेल्या शासकीय रकमेचा शासन स्तरावरुन आलेल्या शासकीय तांदुळ तसेच धान्यादी मालाचा खोटे कागदपत्र तयार करुन अपहार केलेला आहे.
शानबाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेचा माल स्विकारला जातो. परंतु शाळेत विद्यार्थ्यांना शिजवून घेत नाहीत. सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अन्न शिजवून दिलेलेच नसल्याने संबंधीत शाळेने गेल्या १० वर्षाचे शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड देखील खोटे व बनावट तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच त्या रेकॉर्डमध्ये दाखविलेली लाभार्थी संख्या ही देखील बनावट आहे.
सदर शाळेने केलेल्या शालेय पोषण आहार योजनेच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये शासकीय तांदळासह शासकीय रक्कमेचा देखील अपहार झालेला असून मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचा देखील अवमान झालेला आहे. विद्याच्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचीत ठेवले गेलेले आहे. सदर शाळेने शासनाकडे सादर केलेले सर्व कागदपत्र देखील खोटे व बनावट तयार केलेले आहे.
सदर शाळेने शासनाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून व सदर शाळेचे व्यवस्थापन मंडळ यांचेकडून झालेल्या बेकायदेशीर कृत्यांची तसेच या सर्व शासकीय रक्कमेच्या अनुदानाचा) व शासकीय तांदुळ व धान्यादी मालाच्या पोटी शासनाचे आर्थिक नुकसान केले म्हणून सदर शाळा व शाळेचे व्यवस्थापन मंडळ यांनी आजपर्यंत शालेय पोषण आहार योजनेचे सर्व नियमबाह्य काम त्यांच्या स्वतःच्या आकहितासाठी केलेले दिसत आहे. म्हणून या सर्व प्रकारणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे व संबंधीत दोषी यांचेविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई होऊन त्यांचेवर गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याची मागणी श्री.शिंदे यांनी केली होती.त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशी समिती नेमून वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.
अशी आहे चौकशी समिती
विकास एम. पाटील (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पाचोरा) , शामकांत एच नाहळदे (लेखा अधिकारी (शापोआ), शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. जळगाव), अजित ह. तडवी (अधिक्षक (शापोआ), पंचायत समिती, रावेर)
या आहेत प्रमुख मागण्या
१. सदर प्रकरणी झालेल्या गैरप्रकाराची व आर्थिक घोटाळ्याची शालेय प्रशासन, मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन मंडळ व शासनाचे शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी संगनमताने शासनाची गेल्या १० वर्षांपासून वेळोवेळी फसवणुक केल्याप्रकरणी आपल्या संचालनालया स्तरावरुन उच्च पदस्त अधिका-यांची चौकशी समिती नेमुन या संपूर्ण प्रकारणाची सखोल चौकशी ही कालमर्यादित वेळेत फरण्यात यावी.
२. शाळा स्तरावर शाळेच्या प्रशासनाने गेल्या १० वर्षात तयार केलेले शालेय पोषण आहाराचे संपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेवून त्या सर्व दस्तऐवजांची सखोल चौकशी करण्यात यावी.
३. सदर शाळेने केलेल्या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणी सदर शाळेची मान्यता तात्काळ रद करण्यात यावी.
४. सदर शाळेच्या प्रशासन मंडळाने व शाळेच्या व्यवस्थापन मंडळ यांनी शासनाची आर्थीक फसवणुक व लाखो रुपयांचे नुकसान केले म्हणून त्यांचेविरुद्ध व शासनाचे संबंधीत अधिकारी यांचेविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई करून संबंधीतांविरुद्ध शासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात यावे.
५. सदर प्रकरणाच्या चौकशी कामी मला या प्रकरणात वेळोवेळी माझे म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मिळावी.