धरणगाव (प्रतिनिधी) समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. धरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालयात येथील आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने मागील कालखंडात विविध शेतकऱ्यांचा योजना व पक्षप्रमुख तथा महाराष्ट्रचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केलं ते गुलाबराव पाटील यांची बंडखोरी, हे मनाला धक्का देणारी आहे. पण शिवसैनिकांनो डगमगू नका. एक गुलाबराव फुटला, पण दुसरा गुलाबराव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. शिवसेना हे अक्षरच आपले ऊर्जा आहे. त्यातून आपले ऊर्जास्रोत निर्माण होते. आपल्या भाषणात गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच सेना भवनातून आलेल्या प्रतिज्ञापत्र जास्तीत जास्त पदाधिकारी यांनी भरून देण्याचे आव्हान केलं. भविष्यात गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील श्री. वाघ यांनी याप्रसंगी दिला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, मा. नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी,मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पटेल, राजेंद्र ठाकरे, जिल्हा संघटक अँड.शरद माळी, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, अल्पसंख्याक आघाडीचे वसीम पिजारी यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, शहरातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फिरोज पटेल यांनी आपल्या मनोगतात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या कार्याचा लेखा जोखा मांडला आणि आम्ही खरी शिवसेना म्हणजे उध्दव साहेब आणि याच शिवसेने सोबत राहू. तसेच शिवसेनेच्या पडतीचा काळात आता साथ देण्याची वेळ आहे. हीच साथ स्व. सलीम पटेल यांना खरी आदरांजली ठरेल. तसेच सर्व मुस्लिम समाज हा शिवसेनेचा पाठीशी राहील असे मत पटेल यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात आम्ही शिवसेनाला तन-मन आणि धनाने रणनीती आखू., उद्धव साहेब जो आदेश देतील, त्याचे पालन करू. उद्धव साहेब हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की, त्यांनी पदाचा राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होते. बंडखोरांना एवढं दिल्यावर देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास घात केला.
खरचं हिंदुत्वसाठी बंडखोर केली असेल. तर आमदारकीचा राजीनामा द्यावा. परंतू बंडखोरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बंडखोरी केली, असल्याचे प्रतिपादन अँड शरद माळी यांनी केले. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी देखील भाऊक मनोगत व्यक्त केले. तसेच शिवसेनेचे बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असे मत व्यक्त केले.
माजी नगरसेवक भागवत चौधरी यांनी शिवसेना ही कोणाला डगमगनारी नाही. शिवसेनेचा शिवसैनिक हा वाघ आहे. नेते फुटतात पण निष्ठावंत शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारांवर आजही शिवसेना सोबत आहे. शिवसैनिकला लाभ नसतो. परंतू लाभ घेणारे फुटल्याची खंत त्यानी व्यक्त केली. नवनिर्वाचित विकास सोसायटीत घवघवीत यश मिळवलेले सुरेशनाना चौधरी व चेअरमन उमेश महाजन, कैलास मराठे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अतिशय भावपूर्ण असे भाषण केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सांगितले होते की, बंडखोर आमदारांनी माझ्या आजारपणाचा फायदा घेतला. ज्यांना वाढवलं, त्यानी धोका दिला. परंतु निष्ठावंत शिवसैनिक हे माझे कवच आहे. ते माझ्या सोबत असल्याचं उध्दव ठाकरेंनी मार्गदर्शन केले होते. यावेळी शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सोसायटीच्या चेअरमन संचालक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले. तर आभार कार्यालय प्रमुख विनोद रोकडे यांनी मानले.