जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रत्येक महिन्याला स्वच्छतेचे लाखोचे बिल अदा केले जाते. तरी विद्यापीठातील स्वच्छतागृहांची दुर्दशा असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे अॅड. कुणाल पवार यांनी केली आहे.
कुणाल पवार यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, विद्यापीठात स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी फिनाईलवर दरमहा एक लाख रुपयाचे बिल ठेकेदारास अदा केले जाते. परंतु स्वच्छतेच्या बाबीत विद्यापीठातील चित्र विपरीत आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार कसा सुरू आहे?, याची आपल्याला महिती आहे का?, किंवा कोणत्या एका सिनेट सदस्यांचा बेकायदेशीरपणे व्यवस्थापन परिषदचा ठराव करून विधी व कायदा विभागाचे कोणतेही मत न घेता बिले एक सदस्यीय समितीमार्फत काही तरी देणे घेणे करून बिले काढली जातात. बिले देताना स्वच्छतेची शहानिशा तुमचे अधिकारी करतात का?. एका सदस्याच्या दबावाला बळी पडून बिले अदा करत असल्याचा आरोप देखील अॅड. पवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे अॅड. पवार याबाबतचे पुरावे म्हणून काही फोटो माध्यमांना दिली आहेत.