चाळीसगाव (प्रतिनिधी) आंघोळ करून आल्यानंतर सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरातील एका भागात घडली आहे. याप्रकरणी सासऱ्यासह सासू आणि पिडीतेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० मे २०२२ रोजी पिडीत आंघोळ करून आल्यानंतर सासरे देविदासद पाटील याने पिडीतेकडे शरीरसुखाची मागणीकरुन विनयभंग केला. पिडीत विवाहितेने याबाबत पती मंगेश देविदास पाटील आणि सासूला सांगितले. परंतू यानंतर उलट विवाहितेला तू जर कोणास सांगितले किंवा पोलीसात तक्रार दिली, तर तुझी बदनामी करू. एवढेच नव्हे तर फाशी देऊन मारुन टाकून तू आत्महत्या केली, असे लोकांना सांगु अशी धमकी दिल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे.