धरणगाव(प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव यांच्यातर्फे, दिवाळीनिमित्त धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांत, एक हजार गोरगरिब कुटुंबांना व अनाथांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला.
तसेच बोरगाव मतिमंद मुलांच्या वस्तीगृहात ९० हून अधिक अनाथ मुलांना फराळ वाटण्यात आला. तसेच वनकुटे येथील सहवास मतिमंद प्रौढ निवासी शाळेला ७० हून अधिक दिवाळी फराळाची पाकिटे देण्यात आली. संस्थेने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव केंद्राला आभार पत्र दिले. धरणगाव शहरातील जिनिंग व्यवसायात काम करणारे कामगारांना फराळाचे या कालावधीत नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाने वाटप करण्यात आले. या उपक्रमाला तालुका वेले (ता. चोपड़ा) येथे अमर संस्था संचलित प्रतिनिधी राकेश मकवाने, केंद्रप्रमुख राजेंद्र मानव सेवा तीर्थ अनाथालय व वृद्धाश्रमाला २०० पाटील, वसंतराव पाटील यांनी सहकार्य केले.