मुंबई (वृत्तसंस्था) इतर राज्यांशी तुलना केली तर आपला देश न्याय देत नाही आहे. मी आजच सुचवलं की सगळी रिक्त पद भरली गेली पाहिजे. आजपासून 15 दिवसांत 80 पदं क्रीडा शिक्षकांची भरली असतील. 100 पैकी 80 पद भरली जातील. जर नाही झाले तर माझ्यावर हक्कभंग तुम्ही आणू शकता, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं.
क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत आपलं विविध विषयांवर आपलं म्हणणं मांडलं. यावेळी ते म्हणाले, अनेक अडचणी क्रीडाच्या बाबतीत झाल्या. क्रीडा संकुलच्या बाबतीत आपण निर्णय घेतले आहेत. क्रीडा विभागाला आपण जसा न्याय दिला पाहिजे तसा आपण देत नाही आहोत. त्यामुळे 100 पैकी 80 पद भरली जातील. पाच लाखांपर्यंत साहित्य क्रीडा साहित्य ग्रामीण भागात देऊ शकतो. सर्व स्थगित ठेवा. पाच लाखांचं बजेट करा. अशा निर्णय घेतला आहे. अपूर्ण असलेली क्रीडा संकुल लवकरच पूर्ण होतील. निर्णय घेऊन 13 वर्षे झाली. तरी अजून 124 तालुक्यांत क्रीडा संकुलांना जागा मिळाली नाही. त्यामुळं काय काय अडचणी आहेत. त्यासाठी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढू, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. दरम्यान, ग्राम सडक योजनेत काम करण्यावर आम्ही लवकरात लवकर सुरु करू. रस्ते, खड्डे या अडचणी मांडल्या गेल्या आहेत. पथदिव्यांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असतील. राज्य भरातले प्रश्न मांडले जातील. योग्य ते निर्णय लवकरात लवकर घेतले जातील. स्थानिक संस्था व पंचायत संस्था यांना रकम देण्यासाठी पूरक मागण्या मंजूर कराव्या अशी मी मागणी करत आहे, असंही गिरीश महाजन यांनी म्हंटलं.















