जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वित्त लेखा अधिकारी एस.आर. गोहिल यांनी काल कुलगुरूंकडे राजीनामा दिला. उत्तर पत्रिकाच्या मोठ्या प्रमाणातील खर्चास मंजुरीला विरोध केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला का ?, असा सवाल राष्ट्रवादी महानगर सचिव अँड. कुणाल पवार आणि भुषण भदाने यांनी एका पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
पत्रात म्हटले आहे की, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात घडतंय तरी काय?, काल विद्यापीठातील वित्त लेखा अधिकारी एस आर गोहिल यांनी राजीनामा कुलगुरु यांच्याकडे दिला. उत्तर पत्रिकाच्या मोठ्या प्रमाणातील खर्चास मंजुरीला विरोध केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला का ?, याचा खुलासा व्हावा. विद्यापीठातील अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडून राजीनामा देताय याचा खुलासा करावा. मागील कुलगुरूंनी ठेकेदार यांच्या दबावाखाली राजीनामा दिला आहे तेच करण्यासाठी आता पण राजीनामा सत्र सुरु आहे का ?, प्रभारी कुलगुरुंवर दबाव आहे का?, बिले काढण्यासाठी याचा पण खुलासा करावा?, कोरोना काळात ऑनलाइन परीक्षा विद्यापीठाने घेतली तरी एवढा खर्च कसा काय झाला. टेंडर देताना कशा पद्धतीने दिले गेले होते. पाच कोटीची बिले काढण्यासाठी कोणाचा दबाव कुलगुरुंवर आहे व विद्यापीठमधील वित्त अधिकारी का ते बिले काढण्यास नकार देत आहेत का ? त्या बिलांवर सही न करता त्याना राजीनामा देणे योग्य वाटले का ? याचा जाहीर खुलासा कुलगुरूंनी करावा. तसेच संशयित असलेली बिले काढण्यात येऊ नये, अन्यथा भव्य मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी महानगर सचिव अँड. कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव भुषण भदाने यांनी दिला आहे.