जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली येथील ३३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शिरसोली येथील ३३ वर्षीय गिरीष पाटील यांनी आत्महत्या केली. ते गेल्या १३ वर्षांपासून ते बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २७ जानेवारी रोजी रात्री त्याने कुटुंबियासह जेवण करून झोपले. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष पाटील याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी त्यांची पत्नी रेणूका ह्या झोपेतून उठल्या त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

















