मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे समीर वानखेडे हे खंडणीसाठी निर्दोष लोकांना ड्रग्ज प्रकरणात अडकवतात. समीर खान, आर्यन खान यांच्या बाबतीत हेच झालं आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता मलिक यांनी आज नवं ट्वीट करून सस्पेन्स वाढवला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”.
फडणवीसांचं हे आव्हान स्वीकारणाऱ्या नवाब मलिक यांनीही आता दिवाळीनंतर धमाका करण्याची तयारी केली आहे. आज एका मागोमाग एक ट्वीट करून त्यांनी याची चुणूक दाखवली आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे…’ असं मलिक यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर, काही वेळानंतर त्यांनी दुसरं ट्वीट केलं आहे. त्याद्वारे त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांची दिवाळी मंगलमय व्हावी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील ‘द ललित’ हॉटेलचाही उल्लेख केला आहे. या हॉटेलमध्ये अनेक गुपितं लपली आहेत. रविवारी भेटू,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘हॉटेल ललित’मध्ये नेमकं काय घडलंय? त्याचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
















