अंबरनाथ (वृत्तसंस्था) शहरातील पालेगाव भागात कार आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार गणेश भक्तांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अंबरनाथच्या पालेगाव भागात हा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता, की ४ जणांचा जागीच अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनातील लोकं ही गणेश विसर्जनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी आणि मृत पावलेल्यांना पोलिसांनी मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. अपघातातील सर्वच हे उल्हासनगरचे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.