अहमदनगर (वृत्तसंस्था) नगर-औरंगाबाद महामर्गावर कायगाव (ता.गंगापूर) झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी कार (क्रमांक एम.एच.२० सी. एस. ५९८२ ) च्या चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज नाही. त्यामुळे भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार (एम.एच.२७ बी. झेड. ३८८९) ला धडकली. यात औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधील चौघे गंभीर जखमी झाले होते. यावेळी अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृतांमधील तीघांची नावे समजली असून रावसाहेब मोटे(५६) सुधीर पाटील (४५) रा. वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (३८) रा. वाळूज व इतर एकाचा मृत्यू झाला.
मृत चौघेही मित्र असून प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते अशी माहिती मिळाली आहे, चौघेही एका व्यवहारा संदर्भाने नगरला गेले होते. येताना प्रवरासंगम येथे जेवण करून बजाजनगर येथे घरी जात असताना हा अपघात झाला. तर दुसऱ्या कार मधील शशिकला कोराट(७०) सिद्धार्थ जंगले (१४) हेमंत जंगले (५५) छाया जंगले (३५) शंकुतला जंगले (७०) हे पाच जण जखमी झाले होते. या कारमधील जखमी प्रवासी अमरावतीहून देवगड जि. अहमनगर येथे देव दर्शनासाठी मुक्कामी जात होते.