भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडगाव बु. येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील तीन वर्षाच्या निरागस बालकांचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्या बालकाचा मृत्युदेह वडगाव विद्यालयालगत असलेल्या दिलीप जाधव यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला आहे. याबाबत पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत.
तालुक्यातील वडगाव बु. येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा आयुष दिपक गायकवाड (वय ३ वर्ष रा. वडगाव) सतीचे हा मुलगा वडगाव सतीचे येथुन दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास हरवला होता. याबाबत भडगाव पो. स्टे.ला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या बालकाचा मृतदेह वडगाव विद्यालयालगत असलेल्या दिलीप जाधव यांच्या शेतातील विहीरीत आढळुन आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बालकाचा मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बालकाच्या मृत्यूबाबत सशंयित म्हणुन पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. ईश्वर कातकडे, भडगाव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्यासह पो. हे. कॉ. कैलास गिते, पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्निल चव्हाण, नितिन रावते यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.