जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे (NCP) नेते आमदार एकनाथराव खडसे (Eknath khadse) यांचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाहीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) काही मोठी घडामोड घडणार असल्याची चर्चा सुरु झालीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथराव खडसे हे गेल्या ८ दिवसांपासून नॉच रिचेबल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एरवी सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोनदेखील लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्ते करत आहेत. खडसे मुंबईत असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र फोनवर संपर्क होऊ शकत नसल्याने जळगावातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. मागील आठ दिवसांपासून खडसे नॉट रिचेबल असल्यामुळे जळगावाच्या राजकारणात मोठी अघडामोड घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.