जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठमध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठमधील मोठ्या प्रमाणमध्ये सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, प्र. कुलगुरू उपस्थित होते. त्यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही अधिकारी कार्यालयात येवून गेले पण त्यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली नाही. म्हणून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ जाहीर करावे की, कुणाला कोरोनाची लागण झाली आहे व ज्यांना लागण झाली पण कळविले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अँड. कुणाल पवार यांनी केली आहे.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठमधील मोठ्या प्रमाणमध्ये सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, प्र. कुलगुरू उपस्थित होते. त्यापैकी काही जणांना त्यात कोरोनाची लागण झाली आहे. व त्यामधील काही जण घरी देखील कॉरनटाईन आहेत. परंतु त्यांनी सामाजिक भान ठेऊन स्वतः हून जाहीर केले पाहिजे व स्वतः इतरांना त्यांच्या डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांना त्याची महिती देवून चाचणी करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. पण काही अधिकारी ठेकेदाराची बिले काढण्यासाठी कार्यालयात येवून गेले आहेत. तसेच त्यांनी कोणालाही कल्पना दिली नाही की, त्यांना कोरोना झाला आहे. म्हणून विद्यापीठ प्रश्सानाने प्रशासनाने तत्काळ जाहीर करावे की, कोण कोण कार्यक्रमाला उपस्थित होते व कोणाला लागण झाली आहे. तसेच कोणी कोणी विद्यापीठाला कळवले आहे व ज्यांनी कळविले नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व इतर कर्मचारी धोक्यात येऊ नये, अशी मागणी अँड. कुणाल पवार, अतुल कदमबांडे, भूषण भदाणे यांनी केली आहे.















