जळगाव (प्रतिनिधी) प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व एनएसयूआय जिल्हा अध्यक्षांची बैठक दूरदृष्यं प्रणालीद्वारे आयोजित केली होती. या बैठकीत एनएसयुआय प्रभारी तथा कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांनी रिष्ठ नेते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष निष्क्रिय असतील तर एनएसयुआय जिल्हाध्यक्षांनी पुढे येऊन पक्षाचे काम हाती घ्यावे. पक्षामध्ये काम करणाऱ्यांची किंमत राहणार आहे, निष्क्रिय लोकांची पक्षालासुद्धा गरज नाही, असे ते म्हणाले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एनएसयुआय व युवक काँग्रेसचे प्रभारी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यासह व सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
विद्यापीठांमधील संघ विचारधारेच्या व मागील दाराने नियुक्त झालेल्या व्यक्तींना पदापासून दूर करेपर्यंत जिल्हाध्यक्षांचा लढा हा विद्यापीठाशी सुरूच राहील. अशीसुद्धा ग्वाही जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली. या कामगिरीबद्दल कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांनी मराठे यांचे कौतुक केले. कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांनी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या कामांची दखल घेत “जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेते, पदाधिकारी तुमच्या कामाची दखल घेत नसतील व स्वतःही निष्क्रिय असतील तर तुम्ही पुढे यावं व पक्षाचे काम हाती घ्यावे अशा सूचना केल्या.
बैठकीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना सूचना केली की, पक्षाचे काम करताना सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळामध्ये स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊनच संघटनेचे काम करा. येणारा काळ कठीण आहे नागरिकांना आवश्यक ती मदत काँग्रेस पक्षाच्या व संघटनेच्यावतीने करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदेश एनएसयूआयचे सोशल मीडिया अध्यक्ष अभिजीत हळदेकर यांनी केले.