नागपूर (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण टिकलं असतं तर, भाजपला श्रेय मिळालं असतं म्हणून महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला, असं आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे आपले अपयश लपवण्यासाठी हे केंद्र व मागील राज्य सरकार वर सर्व ढकलत आहे. अशोक चव्हाण, नवाब मलिक खोटे बोलत आहेत.हे आरक्षण जर टिकले असते तर श्रेय भाजपला मिळाले असते म्हणून या सरकार ने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला आहे, अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर महविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अनेक आरोप केले होते. त्या आरोपांना प्रतिउत्तर देत फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि नवाब मालिकांनी लावलेल्या आरोपांना थेट उत्तर दिले. न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होत्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या असा थेट आरोपही फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका भाजपच्या लोकांनी केल्या होत्या असा आरोप नवाब मलिक यांनी केल्यानंतर फडणवीसांनी हा प्रतिआरोप केला आहे.
नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला असून ते केंद्रात मागास वर्ग आयोगाचं नाही असे म्हणत आहेत. मात्र, केंद्रात असा आयोग असून भगवान लाल सहानी त्याचे अध्यक्ष आहेत, मुळात नवाब मलिक यांची माहिती चूक असल्याचे फडणवीस म्हणाले. जर आज आम्ही सत्तेत राहिलो असतो तर जसे आम्ही उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा टिकविला होता, सरन्यायाधीश यांच्या समोरही त्यास स्थगिती येऊ दिली नव्हती तसेच समनव्य साधून आम्ही सर्वोच्च न्यायालयातही तो कायदा टिकविला असता असा दावाही फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस वकील आहेत ते न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने का उभे झाले नाही? अशोक चव्हाणांच्या या प्रश्नाला ही फडणवीसांनी आज उत्तर दिले. फडणवीसांची आठवण तुम्हाला कायद्याला स्थगिती आल्यावर आली, मुळात महाविकास आघाडी सरकार चर्चा करण्याच्या मनस्थितीच नव्हते. मला बोलवाव किंवा नाही प्रश्न हे नव्हताच, मराठा आरक्षण टिकले पाहिजे होते.